Ajit Pawar : जेव्हा महाविकास आघाडी सरकार पडलं तेव्हाच…!! अजित पवारांनी शरद पवार यांचे नाव न घेता केला सर्वात मोठा गौप्यस्फोट

Ajit Pawar कोल्हापूर : उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कोल्हापुरात उत्तरदायित्व सभा घेतली. या सभेत बोलताना अजित पवार यांनी मोठा खुलासा केला. अजित पवार (Ajit Pawar) म्हणाले, आमच्यावर लोकांची काम करण्याचा दबाव होता म्हणून आम्ही महायुतीत सामील झालो आहोत.
खरंतर उद्धव ठाकरेंचे (Uddhav Thackeray) सरकार ज्या दिवशी पडत होते, त्याच वेळी एखाद दुसरा आमदार सोडला तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सर्वच्या सर्व आमदारांनी आणि मंत्र्यांनी एक पत्र तयार केले होते. महायुतीत सामील व्हा, असे या पत्रात लिहिले होते. जर हे खोटे असेल तर मी राजकारणातून निवृत्त होईन, असे अजित पवार (Ajit Pawar) म्हणाले आहे.
ते पुढे म्हणाले, आमची बदनामी करण्याचे काम चाललंय. त्यात काही तत्थ्य नाही. महाराष्ट्राला माहीत आहे. मी जे बोलतो ते खरे बोलतो. वस्तुस्थितीला धरून बोलतो.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा शाहू, फुले, आंबेडकर यांच्या कृतीतून पुढे जाण्याचा प्रयत्न करतो. राज्याची कायदा, सुव्यवस्था चांगली राहावी. राज्यातील जनतेने गुण्यागोविंदाने राहावे, यासाठी सत्तेत येण्याचा निर्णय घेतला आहे.
तसेच त्यांनी मराठा आरक्षणासंदर्भातही भाष्य केले. “सरकारला निजामाचे पुरावे चालतात, पण छत्रपतींचे नाही, अशी टीका काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी केली होती.
त्याला प्रत्युत्तर देत पवार म्हणाले, तुम्हीसुद्धा एकेकाळी चार वर्ष मुख्यमंत्री होता, टीका करणे खूप सोपे आहे. जे कोणी टीका करत आहेत, ते कधी ना कधी राज्याचे प्रमुख होते. आत्ता जे सत्तेवर आहेत ते आहेतच. यातून कोणीच सुटणार नाही, असे स्पष्टीकरण अजित पवार यांनी दिले आहे.