आदित्य ठाकरेंना अटक होणार!! राज्यातील बड्या नेत्याच्या वक्तव्याने राजकीय खळबळ


मुंबई : भाजप आमदार आणि मंत्री नितेश राणे यांनी मोठा गौप्यस्फोट करत आदित्य ठाकरे यांच्यावर अटक होण्याचे संकेत दिले आहेत. यामुळे मोठी खळबळ उडाली आहे. उद्धव ठाकरेंचा मुलगा पावसाळ्यात जेलची वारी करू शकतो, असं वक्तव्य करत नितेश राणे यांनी एकच राजकीय खळबळ उडवून दिली आहे. यामुळे चर्चा सुरु आहे.

याबाबत ते म्हणाले, डिनो मोरिया प्रकरणात होत असलेल्या कारवायांमुळे ठाकरे कुटुंब अडचणीत येऊ शकते, असा सूचक इशारा त्यांनी दिला. या वक्तव्यानंतर ठाकरे वर्तुळात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. याच प्रकरणामुळेच ठाकरे बंधू पुन्हा एकत्र येण्याची चर्चा रंगवली जात आहे, जेणेकरून लक्ष भटकवता येईल.

आता पावसाळ्यात तुरुंगवारी होणार, हे सुद्धा ठरलेले आहे, असे म्हणत त्यांनी आरोपांची धार अधिक तीव्र केली. डिनो मोरियावर ईडीने सुरू केलेल्या तपासाची फाईल सध्या गरम असतानाच, त्याचे काही संबंध मुंबईतील नालेसफाई प्रकरणाशी जोडले जात आहेत. डिनो मोरिया कोणासोबत बसायचा, कोणाचे निकटवर्तीय होता, याकडे लक्ष वेधत नितेश राणे यांनी आदित्य ठाकरेंचे नाव घेतले.

तसेच ते म्हणाले, हिंदुत्व सोडल्यामुळे ठाकरे ब्रँड बुडाला, असा घणाघात करत राणे यांनी शिवसेनेवर टीका केली. तुळजाभवानी दर्शनानंतर पत्रकार परिषदेत त्यांनी हे सर्व वक्तव्य केले. धाराशिव जिल्ह्याच्या दौऱ्यावर असताना माध्यमांशी संवाद साधताना राणे यांनी हे वक्तव्य केलं.

दरम्यान, राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येण्याच्या शक्यतेवरही नितेश राणे यांनी जोरदार टोले लगावले. याबाबत ते म्हणाले, एका बाजूला २० आमदार, दुसऱ्या बाजूला शून्य, आणि आम्ही घाबरलो म्हणे! असे म्हणत त्यांनी या युतीची खिल्ली उडवली. या वक्तव्याने ठाकरे समर्थकांमध्ये नाराजीचे वातावरण आहे. आता आगामी काळात राज्यात काय घडणार हे लवकरच समजेल.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!