ज्येष्ठ अभिनेते भालचंद्र कुलकर्णी यांचे निधन ! वयाच्या ८८ वर्षी घेतला अखेरचा निरोप…!

कोल्हापूर : मराठी अभिनेते भालचंद्र कुलकर्णी यांचे अल्पशा आजाराने निधन झाले आहे. वयाच्या ८८ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला आहे.
भालचंद्र कुलकर्णी यांनी मर्दानी (१९८३), मासूम (१९९६), झुंज तुझी माझी (१९९२), हळद रुसली कुंकू हसलं (१९९१), माहेरची साडी (१९९१) या चित्रपटात भूमिका केल्या आहेत. नवरा नको गं बाई, सोंगाड्या, पिंजरा, थरथराट, मुंबईचा जावई, खतरनाक या चित्रपटांतही त्यांनी भूमिका साकारल्या आहेत.
कोल्हापुरातील पंचगंगा स्मशानभूमीत दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
Views:
[jp_post_view]