वळतीचे माजी उपसरपंच बाळासाहेब कुंजीर यांचे अपघाती निधन ….!

उरुळीकांचन : पुणे – सोलापूर महामार्गावरील बोरीभडक – चंदनवाडी (ता. दौंड) हद्दीत एसटी बस व दुचाकीच्या अपघातात वळती (ता. हवेली) येथील जय मल्हार विविध कार्यकारी सोसायटीचे माजी चेअरमन बाळासाहेब दत्तात्रय कुंजीर (वय- 57) यांचे अपघाती निधन झाले आहे.
बुधवारी (ता. 18) दुपारी एक वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला आहे. उरुळी कांचनवरून यवत बाजूकडे जाताना हा अपघात झाला असून नेमका हा अपघात कसा झाला याची माहिती अद्याप मिळू शकली नाही. कुंजीर यांनी 2000 ते 2002 वळती ग्रामपंचायतीचे उपसरपंचपद भूषवले असून सामजिक कार्यात अग्रेसर होते. तसेच जय मल्हार विविध कार्यकारी सोसायटीचे तब्बल 25 वर्ष चेअरमन होते.
दरम्यान, बाळासाहेब कुंजीर यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, मुलगी असा परिवार आहे. बाळासाहेब कुंजीर यांच्या अपघाताची माहिती मिळताच शिंदवणे, वळतीसह उरुळी कांचन परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.