विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी! आता एका दिवसात मिळणार जात प्रमाणपत्र, प्रवेशाआधी विद्यार्थ्यांना दिलासा..

पुणे : सध्या दहावी आणि बारावीचा निकाल जाहीर झाला आहे. आता पुढील शैक्षणिक गोष्टींची तयारी विद्यार्थी करत आहेत. असे असताना आता त्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.
यासाठी सर्व कागपत्रांची जुळवाजुळव देखील काहींनी सुरू केली असेल. अशातच आता जात पडताळणी कार्यालयाकडून एका दिवसात किंवा जास्तीत जास्त आठ दिवसात जात पडताळणी प्रमाणपत्र मिळणार आहे.
पडताळणी समितीने याबाबतचे नियोजन केले आहे. जात प्रमाणपत्रासाठी तीन महिन्यांचा कालावधी लागतो मात्र विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये. यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.
यासाठी विद्यार्थ्यांना www.barti.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर जात वैधता प्रमाणपत्रासाठी अर्ज करावा लागेल. यासाठी संबंधित कॉलेजचे पत्र किंवा चालू शैक्षणिक वर्षाचे बोनाफाईड लागणार आहे.
तसेच अर्जावर संबंधित कॉलेजच्या प्राचार्यांची स्वाक्षरी, शिक्का आणि अर्जदाराचा फोटो, अर्जदाराचा शाळा सोडल्याचा दाखला व पहिलीचा प्रवेश निर्गम उतारा, अर्जदाराचा जातीचा दाखला झेरॉक्स प्रत लागणार आहे.
तसेच अर्जदाराची आत्या किंवा चुलत्याचा शाळा सोडल्याचा दाखला, अर्जदाराचे आजोबा किंवा चुलत आजोबांचा शाळा सोडल्याचा दाखला, इतर महसुली पुरावे (गाव न. सात, टॅक्स पावती, खरेदीखत, सहा-ड, फेरफार उतारा, गहाणखत, मालमत्तापत्रक) वंशावळ नमुना नं. तीन कोऱ्या कागदावर शपथपत्र व फॉर्म नं. १७ (शपथपत्र). लागणार आहे.