“संतश्रेष्ठ जगद्गुरु तुकाराम महाराज’’ पालखी सोहळा उरुळी कांचनला येणार का नाही याचा निर्णय ५ जूनपर्यंत कळवा; अन्यथा ग्रामस्थ गावबंद आंदोलन करणार

उरुळी कांचन : संत तुकाराम महाराज पालखी सोहळा उरुळी कांचन मधील पारंपारिक विसाव्याच्या ठिकाणी येणार का नाही? याचा निर्णय ५ जून पर्यंत जगद्गुरु संत तुकाराम महाराज संस्थान देहूच्या पालखी सोहळा प्रमुखांनी उरुळी कांचन गावाला कळवला नाही तर उरुळी कांचन ग्रामस्थ सत्याग्रह,गावबंद आंदोलन,रास्ता रोको आंदोलन करण्याच्या तयारीत असल्याची भूमिका ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे.
आज उरुळी कांचन गावात पालखी येणार नाही याविषयी चर्चा करुन निर्णय घेण्यासाठी उरुळी कांचन देवस्थान समिती, श्री काळभैरवनाथ सेवा समिती व ग्रामपंचायत उरुळी कांचन यांच्या संयुक्त विद्यमाने ग्रामस्थांची एक बैठक बोलावली होती
या बैठकीत वरील प्रकारे तीव्र भावना ग्रामस्थांनी व्यक्त केल्या आहेत. यावेळी लोणी काळभोर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दशरथ चव्हाण,पोलीस निरीक्षक सुभाष काळे,उरुळी कांचन पोलीस दूरक्षेत्राचे स.पो.नि. किरण धायगुडे.
मित्रांनो व्हाट्सअँप ग्रुपवर व्यक्त होताना काळजी घ्या! बारामतीत व्हाट्सअँप ग्रुपवर पोलिसांची कारवाई
सरपंच राजेंद्र बबन कांचन, देवस्थान समितीचे अध्यक्ष माऊली कांचन,श्री काळभैरवनाथ सेवा समितीचे अध्यक्ष राजाराम कांचन,माजी जिल्हा परिषद सदस्य महादेव कांचन,माजी सरपंच संतोष ह.कांचन, दत्तात्रय शां. कांचन,देवस्थान समितीचे विश्वस्त युवराज कांचन, दीपक कांचन,विनोद कांचन,माजी उपसरपंच दत्तात्रय कांचन,भाऊसाहेब तुपे,रामभाऊ तुपे,भाऊसाहेब कांचन,गाव कामगार तलाठी सुधीर जायभाय, ग्रामविकास अधिकारी यशवंत डोळस, ग्रामपंचायत सदस्य, विविध संस्थांचे पदाधिकारी व ग्रामस्थ उपस्थित होते,
प्रास्ताविक ग्रामपंचायत सदस्य सुनील तांबे यांनी केले.
या बैठकीत प्रांताधिकारी संजय आसवले यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीचा इतिवृत्तान्त ग्रामस्थांना अवगत केला व आपली मते मांडण्यास सांगितले त्यानंतर विविध संस्थांचे पदाधिकारी व ग्रामस्थांनी उरुळी कांचन येथे संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याचा विसावा पारंपारिक पद्धतीने श्री काळभैरवनाथ मंदिरात होतो, पालखी सोलापूर रोड वरून गावात येताना हॉटेल एलाईट चौक ते हॉटेल शैलजा चौक हा जो दिड किलोमीटरचा टप्पा आहे याला शासन दरबारी पालखी मार्ग अशा प्रकारची मान्यता दिलेली आहे, यावर शासन निधी टाकून देखभाल दुरुस्ती करीत असते म्हणजेच हा मार्ग अधिकृतपणाने पालखी सोहळ्याचा मार्ग आहे, या मार्गानेच पालखी सोहळा उरुळी कांचन गावातून मार्गस्थ व्हावा अशी भावना व्यक्त केली व वरील इशारा दिला.
यावेळी बैठकीत मार्गदर्शन करताना वरिष्ठ पोलीस निरीक्षक दशरथ चव्हाण म्हणाले की, आम्ही पालखी सोहळ्या दरम्यान कोणताही अनुचित प्रकार होऊ नये याबाबतची दक्षता घेत असताना, उरुळी कांचन व पंचक्रोशीतील सुमारे एक लाख लोकांच्या संत तुकाराम महाराज व श्री विठ्ठलाच्या प्रती असलेल्या सद्भावना दुखावल्या जातील अशा पद्धतीचा निर्णय होऊ नये,म्हणून प्रशासकीय पातळीवर समन्वयातून मार्ग काढण्याचा प्रयत्न करणार आहोत.
याप्रसंगी प्रशासकीय अधिकारी व पालखी सोहळा विश्वस्त यांच्याबरोबर चर्चा करण्यासाठी उरुळी कांचन गावाच्या वतीने एक कमिटी नियुक्त करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे,आभार नियोजन मंडळ माजी सदस्य संतोष आ.कांचन यांनी व्यक्त केले.