‘मिट्टी मे मिला दूंगा’ म्हणत योगींनी ठोकले १८६ गुन्हेगार ! योगी पर्वात एन्काऊंटर चा दरारा वाढला !!


लखनौ : देशात उत्तर प्रदेश हे राज्य गुन्हेगारीसाठी प्रसिद्ध होते. असे असताना योगी सरकार आल्यापासून याठिकाणी अनेक गुन्हेगारांचा एन्काऊंटर करण्यात आला आहे. २०१७ पासून आतापर्यंत १८६ गुन्हेगारांचा एन्काऊंटर म्हणजे दर १५ दिवसाला एक गुंड पोलिस चकमकीत ठार होत आहे.

तसेच पोलिस गोळीबारात जखमी झालेल्या गुन्हेगारांची संख्या ५०४६ इतकी आहे. उत्तरप्रदेशमध्ये गुंड आणि पोलिस यांच्या चकमकीत ठार झालेल्या एकूण १८६ गुन्हेगारांपैकी ९६ गुन्हेगारांवर खुनाचे गुन्हे दाखल आहेत.

तसेच काही गुन्हेगारांवर विनयभंग, गँगरेप आणि पॉक्सोसारखे गुन्हे दाखल आहेत. २०१६ ते २०२२ या कालावधीत राज्यातील गुन्हेगारीचा आलेख झपाट्याने घसरला आहे.

दरम्यान, गँगस्टर अतिक अहमद आणि अशरफ अहमदची पोलीस बंदोबस्तात असतानाही खुलेआम हत्या करण्यात आली आहे. पोलीस या दोन्ही गँगस्टर भावांना वैद्यकीय चाचणीसाठी घेऊन जात होते.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!