मोठी बातमी! ३ की २१ डिसेंबर, राज्यातील नगरपरिषद आणि नगरपंचायत निवडणुकीची मतमोजणी कधी? आज न्यायालयात महत्त्वाची सुनावणी…


मुंबई : निवडणूक आयोगाने स्थानिक स्वराज्य संस्थेसाठी सुरवातीला २ डिसेंबरला मतदान आणि३ डिसेंबरला निकाल लागेल, असे जाहीर केले होते. मग न्यायालयीन अपिलाचा पेच निर्माण झालेल्या संस्थांत २० डिसेंबरला मतदान २१ डिसेंबरला मतमोजणीचा आदेश काढण्यात आला. त्यावर औरंगाबाद खंडपीठात काल झालेल्या सुनावणीवेळी सर्वच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या मतमोजणीचा निकाल २१ डिसेंबरला लावता येईल का, अशी विचारणा मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने केली.

त्यावर निवडणूक विभागाचे वकील वकीलांनी यासंदर्भातील निवेदन आज दुपारच्या सुमारास करण्यात येईल, असे सांगितले आहे. पैठण, कोपरगाव, अंबाजोगाई, उदगीरच्या याचिकाकर्त्यांचे म्हणणे ऐकल्यानंतर मंगळवारी होणाऱ्या निवडणुकांची तयारी झाली आहे. निवडणूक अधिकारी आणि स्टाफ केंद्रांवर पोहोचला आहे. म्हणून न्यायालयाने जेथे निवडणूक होणार आहे त्यांना परवानगी दिली.काही नगरपरिषद आणि नगरपंचायतीच्या निवडणुका रद्द करीत निवडणूक आयोगाने घोषित केलेल्या सुधारित कार्यक्रमाबाबत दाखल याचिकांवरील सुनावणी सोमवारी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात झाली.

त्यावेळी सर्वच ठिकाणांचा निकाल २१ डिसेंबरला लावता येईल का, अशी विचारणा न्या. विभा कंकणवाडी व न्या. हितेन वेणेगावकर यांनी केली. त्यावर निवडणूक आयोगाचे वकील सचिंद्र शेट्ये यांनी यासंदर्भात मंगळवारी दुपारी १२:३०च्या सुमारास निवेदन करू, असे सांगितले.

राज्य निवडणूक आयोगाने ४ नोव्हेंबर रोजी घोषित केलेल्या निवडणूक कार्यक्रमानुसार निकाल ३ डिसेंबर रोजी घोषित होणार होते. मात्र, जेथे पेच निर्माण झाले तेथे २० डिसेंबर रोजी मतदान घेण्याचा व २१ डिसेंबरला निकाल घोषित करण्याचा सुधारित आदेश २९ नोव्हेंबर रोजी काढण्यात आला.राज्यातील २६४ नगरपालिका आणि नगरपंचायतीच्या निवडणुकीसाठी आज (मंगळवारी, ता २) मतदान होत असून, त्यासाठी संपूर्ण मतदान यंत्रणा सज्ज झाली आहे.

सकाळी ७:३० वाजता मतदानास सुरुवात होईल आणि सांयकाळी ५:३० पर्यंत मतदानाची वेळ असेल, या निवडणुकांची मतमोजणी लगेच दुसऱ्या दिवशी बुधवारी होणार आहे. तब्बल आठ ते दहा वर्षांनंतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पार पडत असल्याने उमेदवार, कार्यकर्ते आणि मतदारांची मतदानाबाबतची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. निवडणुका जिंकण्यासाठी राजकीय पक्षांनीही कंबर कसली आहे.

निमशहरी भागातील मतदार आपला कौल कुणाच्या बाजूने मतदान यंत्रात बंद करतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.निवडणुकीत एकूण १२ हजार ३१६ मतदान केंद्रांसाठी ६२ हजार १०८ निवडणूक अधिकारी, कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली आहे. मतदान केंद्रांवर पोलिसांमार्फत पुरेशा बंदोबस्ताची देखील व्यवस्था करण्यात आली आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!