वारं फिरलं! राज्यातील ‘या’ भागांना यलो अलर्ट जारी; हवामान विभागाचा महत्त्वाचा इशारा…


पुणे : दिवाळी सणाच्या आनंदात नागरिक रमलेले असताना, मुंबईसह महाराष्ट्रात पावसाने अचानक हाहाकार माजवला आहे. ऑक्टोबर महिना संपत आला असला तरी, हवामान विभागाने सांगितल्याप्रमाणे, पाऊस अजून राज्य सोडण्यास तयार नाही.

भारतीय हवामान विभागानुसार, बंगालच्या उपसागरावर चक्रीवादळ निर्माण झाले असून त्याचा प्रभाव राज्यात जाणवत आहे. कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील काही जिल्ह्यांसाठी यलो अलर्ट जारी केला गेला आहे.

दरम्यान, या भागांमध्ये विजांचा गडगडाट, हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस आणि ताशी ३०–४० किलोमीटर वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे. नागरिकांनी अचानक वादळ किंवा जोरदार पावसासाठी खबरदारी घेण्याचे आवाहन IMD कडून करण्यात आले आहे.

       

मुंबई, ठाणे, कल्याणसह काही भागात मोकळ्या मैदानात आयोजित केलेले दिवाळी पहाटचे कार्यक्रम पावसामुळे रद्द करावे लागले. पावसाचा जोर पाणी तुंबवण्याइतका नसला तरी, चिखल होण्याइतका आहे. त्यामुळे दिवाळीत नातेवाईक आणि मित्र परिवाराला भेटायला निघालेल्या नागरिकांचे हाल होत आहेत. नागरिकांच्या आनंदावर पावसाचा थेट परिणाम होत आहे.

मागील दोन दिवसांपासून राज्यभर पावसाचे सततचे स्वरूप आहे. २१ ऑक्टोबर रोजी लक्ष्मीपूजनाच्या संध्याकाळी मुंबईत अचानक पाऊस कोसळला, तर २२ ऑक्टोबर रोजी संपूर्ण महाराष्ट्रात विजेच्या गडगडाटासह पाऊस पडला. हवामान विभागाने नागरिकांना योग्य ती काळजी घेण्याचे सल्ले दिले आहेत, जेणेकरून अचानक वादळ किंवा जोरदार पावसाचा सामना करता येईल.

दरम्यान, दुसरीकडे, दिवाळीच्या निमित्ताने फटाक्यांच्या आतषबाजीमुळे मुंबईची हवा गंभीरपणे प्रदूषित झाली आहे. मंगळवारी हवा निर्देशांक तब्बल २११ इतका नोंदवला गेला, जे आरोग्यास हानिकारक आहे. त्यामुळे, पावसाने काही प्रमाणात प्रदूषण कमी केले असले तरी, नागरिकांनी श्वास घेताना खबरदारी घेणे आवश्यक आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!