गुडघ्यापासून पाय अन् मनगटापासून हात तोडला, चुलत भावांनी भावकीच्या वादातून पाडला रक्ताचा सडा, दौंड येथील घटनेने खळबळ..

दौंड : दौंड तालुक्यातील बिरोबावाडी परिसरात एक धक्कादायक घटना समोर आली आहे. इथं तीन चुलत भावांनी एका तरुणावर जीवघेणा हल्ला केला आहे. आरोपींनी तरुणाचे थेट हात पाय तोडले आहेत. दोन्ही अवयव धडावेगळे केले आहेत. हा प्रकार उघडकीस येताच दौंड तालुक्यात खळबळ उडाली आहे.
या प्रकरणी यवत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दोन आरोपींना अटक केली आहे. दौंड तालुक्यातील बिरोबावाडी परिसरात हि धक्कादायक घटना घडली आहे.
मिळालेल्या माहिती नुसार, शेतीच्या बांधावरील वादातून चुलत भावांनीच आपल्या भावाचे निर्घृणपणे हात पाय तोडून शरीरापासून वेगळे केले आहेत. कैलास हगारे असं गंभीर जखमी झालेल्या शेतकरी तरुणाचं नाव आहे.
हल्ल्याची ही घटना समोर येताच त्यांना तातडीने उपचारासाठी पुण्यातील रुग्णालयात दाखल केलं आहे. जखमी कैलास यांचे मागील काही दिवसांपासून चुलत भावांसोबत शेतातील बांधावरून वाद सुरू होता. हा वाद विकोपाला गेल्यानंतर आरोपींनी कैलासवर जीवघेणा हल्ला केला. \
आरोपींनी राक्षसी पद्धतीने फावडे आणि खोऱ्याच्या सहाह्याने कैलासवर हल्ला केला. आरोपींनी हात आणि पाय दोन्ही शरीरापासून वेगळे केले. यानंतर आरोपींनी शेतातच तरुणाला टाकून पळ काढला.
या घटनेची माहिती पोलिसांना मिळताच यवत पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी घटनास्थळाचा पंचनामा करून गुन्हा दाखल केला. सोमनाथ हगारे, प्रवीण हगारे, गणेश हगारे आणि इतर तीन जणांच्या विरोधात हत्येच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी आतापर्यंत दोन आरोपींना अटक केली आहे. इतर आरोपींचा शोध घेत आहेत