पालखी महामार्गाचे लाखो रुपये पाण्यात!! भवानीनगरमध्ये केलेले काम पडण्यास सुरुवात, उड्डाण पुलाबाबत अजूनही संभ्रम…


भवानीनगर : येथील छत्रपती सहकारी साखर कारखान्याच्या समोरील पालखी महामार्गावर सुरुवातीला केलेले काम पडण्यास आज सुरुवात करण्यात आली आहे. यामुळे लाखो रुपये वाया गेले असून याठिकाणी नेमकं करायचंय काय असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

सध्या संत तुकाराम महाराज पालखी सोहळा दोन दिवसांवर आला असून यासाठी प्रशासनाने तयारी सुरू केली आहे. असे असताना याठिकाणी पूर्वी तयार करण्यात आलेला रोड पाडण्यात आला आहे. यामुळे मोठं नुकसान होणार आहे.

याठिकाणी अजूनही रोड नेमका कसा आहे याबाबत संभ्रम आहे. यामुळे सरकारच्या तिजोरीत लाखो रुपये खर्च वाया जात असून नागरिकांना देखील वेड्यावाकड्या रोडमुळे अडचणी निर्माण होत आहे. याठिकाणी मोठ्या संथ गतीने काम सुरू असून आता पालखी येणार असल्याने कामाला गती आली आहे.

असे असताना जुने काम पाडून आता नवीन काम केले जाणार आहे. यामुळे योग्य नियोजन नसल्याने तोडफोड सुरू आहे. यामुळे खर्च वाया जाणार आहे. हा जनतेचा पैसे असून कामाचे योग्य नियोजन करूनच काम करणे गरजेचे आहे. याठिकाणी कारखाना असल्याने रोड नेमका कसा असावा याबाबत पूर्वीपासूनच याबाबत संभ्रम आहे.

याठिकाणी नियोजन करूनच काम करणे गरजेचे आहे. अशी मागणी सर्वसामान्य करत आहेत. येणाऱ्या काळात तरी काम योग्य नियोजन करून कारखान्याला काही अडचण येणार नाही, तसेच शासनाचे पैसे वाया जाणार नाहीत, या पद्धतीने करण्याची मागणी केली जात आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!