शिक्षणाच्या गुणवत्तेत वाढ अन् प्राध्यापकांच्या क्षमतेत सुधारणेसाठी राज्यात क्वांटम संगणन उपक्रम, चंद्रकांत पाटील यांचा मोठा निर्णय…

मुंबई : राज्यातील उच्च शिक्षणाच्या गुणवत्तेत वाढ करण्यासाठी आणि प्राध्यापकांच्या क्षमतेत गुणात्मक सुधारणा घडविण्याच्या उद्देशाने ‘क्वांटम संगणन उपक्रम’ राबविण्याचा निर्णय घेण्यात आला. मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत याबाबत निर्णय घेण्यात आला आहे.
या अंतर्गत राज्यातील ५०० हून अधिक प्राध्यापकांना क्वांटम तंत्रज्ञानासंदर्भातील विशेष प्रशिक्षण देण्यात येणार आहे. हा उपक्रम आय-हब क्वांटम तंत्रज्ञान फाउंडेशन आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ यांच्या सहकार्याने राबविण्यात येणार आहे, अशी माहिती देखील त्यांनी दिली आहे.
या बैठकीला उच्च व तंत्रशिक्षण विभागाचे अपर मुख्य सचिव बी. वेणुगोपाल रेड्डी, तंत्रशिक्षण विभागाचे संचालक डॉ. विनोद मोहितकर, उपसचिव संतोष खोरगडे, डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. कारभारी काळे उपस्थित होते.
तसेच मित्र संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रवीण परदेशी, क्वांटम तंत्रज्ञान कक्षाचे प्रमुख डॉ. जे. बी. व्ही. रेड्डी आय-हब क्वांटम तंत्रज्ञान फाउंडेशनचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. कुंज टंडन, प्रकल्प संचालक आणि IISER पुण्याचे प्राध्यापक प्रा. सुनील नायर, मित्राच्या शिक्षण सेलचे वरिष्ठ सल्लागार पूजा मिसाळ तसेच संबंधित अधिकारी उपस्थित होते.
दरम्यान, राज्यातील उच्च शिक्षणाच्या गुणवत्तेत वाढ करण्यासाठी याचा फायदा होणार असून प्राध्यापकांच्या क्षमतेत गुणात्मक सुधारणा घडविण्याच्या उद्देशाने ‘क्वांटम संगणन उपक्रम’ राबविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. याबाबत माहिती देण्यात आली आहे.