आम आदमीचा मध्यमवर्गीयांसाठी खास जाहीरनामा, नेमकं काय म्हणाले केजरीवाल, जाणून घ्या…


नवी दिल्ली : दिल्लीतील राजकीय गोंधळाच्या पार्श्वभूमीवर बुधवारी आम आदमी पक्षाचे राष्ट्रीय संयोजक आणि दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी मध्यमवर्गीय कुटुंबांसाठी वेगळा जाहीरनामा प्रसिद्ध केला आहे.

तसेच देशाचा पुढील अर्थसंकल्प मध्यमवर्गासाठी समर्पित असावा अशी आमची मागणी आहे. त्यासाठी आज मी केंद्र सरकारकडे ७ मागण्या करत आहे.” असे आपचे राष्ट्रीय संयोजक अरविंद केजरीवाल यांनी सांगितले.

केजरीवाल यांनी इतर राजकीय पक्षांवर मध्यमवर्गीयांचा ‘सरकारसाठी केवळ एटीएम’ म्हणून वापर केल्याचा आरोप केला. त्यांनी ‘आप’च्या जाहीरनाम्यात, मध्यमवर्गीयांचे जीवनमान सुधारण्यासाठी केंद्र सरकारकडे सात मागण्या केल्या आहेत.

केजरीवाल यांनी इतर राजकीय पक्षांवर मध्यमवर्गीयांचा ‘सरकारसाठी केवळ एटीएम’ म्हणून वापर केल्याचा आरोप केला. त्यांनी ‘आप’च्या जाहीरनाम्यात, मध्यमवर्गीयांचे जीवनमान सुधारण्यासाठी केंद्र सरकारकडे सात मागण्या केल्या आहेत.

शिक्षणाचे बजेट २ टक्क्यांवरून १० टक्क्यांपर्यंत वाढवावे. खासगी शाळांमधील फीवर मर्यादा घालायला हवी. उच्च शिक्षणासाठी अनुदान आणि शिष्यवृत्ती द्यावी. आरोग्य बजेट १० टक्क्यांपर्यंत वाढवावे. आरोग्य विम्यावरील कर हटवला पाहिजे. चौथा, आयकर सवलत मर्यादा ७ लाखांवरून १० लाखांपर्यंत वाढवायला हवी.

जीवनावश्यक वस्तूंवरून जीएसटी काढून टाकावा. ज्येष्ठ नागरिकांसाठी एक प्रभावी निवृत्ती योजना आणि पेन्शन योजना हवी. ज्येष्ठ नागरिकांसाठी देशभरातील सर्व सरकारी आणि खासगी रुग्णालयांमध्ये मोफत वैद्यकीय सेवा असायला हवी. ज्येष्ठ नागरिकांना रेल्वे प्रवासात ५० टक्के सवलत मिळावी. अशा सात मागण्या केजरीवाल यांनी केंद्र सरकारपुढे ठेवल्या आहेत.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!