Jai Pawar : पावसामुळे चिखल झाला पण योजनेच्या जलपूजनासाठी जय पवारांनी ट्रॅक्टर चालवला, बाबुर्डीत नेमकं काय घडलं?

Jai Pawar : उपमुख्यमंत्री अजित पवार त्यांच्या धडाकेबाज कामामुळे अवघ्या महाराष्ट्राला परिचित आहेत, अन् वर्षानुवर्षे त्यांची जनतेशी असलेली नाळ घट्ट आहे, तशाच पद्धतीने जय पवारांनी कार्यकर्त्यांशी संवाद साधत असतात. सध्या अशीच एक घटना जोरदार चर्चेत आहे.
बाबुर्डी (ता. बारामती) येथे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे चिरंजीव जय पवार हे गावभेट दौऱ्यानिमित्त आले होते. लोकसभेच्या निवडणुकीमध्ये बाबुर्डी गावाने सुनेत्रा पवार यांना लीड देऊन अजित पवारांवर विकासाचा वादा म्हणत त्यांच्यावर विश्वास दाखवला होता.
गावातील महीला भगिनींनी राख्या बांधत लाडकी बहिण योजनेचे स्वागत व आभार मानले. मग योजनेच्या जलपूजनासाठी जय पवार निघाले, तेव्हा रस्त्यातील चिखलामुळे गाड्या जाणार नाहीत असे लक्षात येताच थेट स्वतःच ट्रॅक्टर चालवला.
बाबुर्डीत आल्यानंतर गावकऱ्यांशी संवाद साधताना जय पवार यांना गावकऱ्यांनी विधानसभेला दादांशिवाय पर्याय नसून आज येणारे विरोधक निवडणूक झाल्यावर परत येणार नाहीत, त्यामुळे लोकसभेपेक्षाही विधानसभेला चांगले काम करु असा निर्धार व्यक्त केला. गावकऱ्यांशी संवाद साधल्यानंतर जनाई उपसा सिंचन योजनेच्या माध्यमातून खोरेमळा येथे सोडण्यात आलेल्या पाण्याचे जलपूजन करायचे होते. Jai Pawar
कच्च्या रस्त्याने चिखल असल्यामुळे व पाऊस झाल्यामुळे अखेर दुचाकी जाणार नाहीत हे लक्षात येताच जय पवार यांनी स्वतः ट्रॅक्टर चालवत कार्यकर्ते आणि बालचमूला सोबत घेऊन जलपूजनस्थळी गेले. जय पवारांनी कार्यकर्त्यांशी संवाद साधत ट्रॅक्टर चालवत जलपूजन करण्यासाठी येतात. हेच अनेकांना अप्रूप वाटले.