Chhagan Bhujbal : आता ओबीसींनी पुकारला एल्गार! आंदोलन सुरू करण्याबाबत छगन भुजबळ यांचा मोठा इशारा, म्हणाले…

Chhagan Bhujbal : मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्त्वाखाली लाखोंच्या संख्येने निघालेले मराठा समाजाचे वादळ आज शनिवारी (ता.२६) वाशीत पोहोचले आहे. या ठिकाणी मराठ्यांचा जनसागर उसळला आहे. यावेळी जरांगे पाटील सरकारच्या नव्या जीआरवर काय भूमिका घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
राज्य सरकारच्या शिष्टमंडळाने वाशीमध्येच आंदोलन मागे घेण्याबाबत मनोज जरांगे यांना विनंती केली आहे. पण मुंबईत येण्यावर मनोज जरांगे ठाम आहेत. आझाद मैदानात जाऊन घोषणा करण्याबाबत मनोज जरांगे ठाम आहेत. मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर मंत्री छगन भुजबळ यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. Chhagan Bhujbal
छगन भुजबळ म्हणाले की, कायद्याच्या कसोटीत जे काही उतरेल ते देण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. आजकाल कुणीही कोर्टात जातो, त्याची चिरफाड होते त्यामुळे कायद्यात काय बसेल त्यानुसार होईल. मराठा समाजाला वेगळं आरक्षण द्या, असे माझे देखील म्हणणे आहे. पण ओबीसीवर अन्याय होता नये या मतावर आम्ही ठाम आहोत, असे भुजबळ म्हणाले आहेत.
ओबीसींवर अन्याय झाला तर निश्चितपणे ओबीसी समाजाचे देखील आंदोलन सुरू होईल, असा इशारादेखील त्यांनी यावेळी दिला आहे. दोन्ही बाजूचा विचार करून योग्य तो निर्णय सरकार घेईल. आम्ही आमची मतं जाहीर सभेतून मांडतो आणि आम्ही त्याला विरोध देखील करतो आणि आम्ही ती मांडू, असे देखील छगन भुजबळ यांनी म्हटले आहे.