Manoj Jarange Patil : मनोज जरांगे पाटील यांच्या सभेत गोंधळ, तरुण म्हणाला, मला बोलू द्या, नाहीतर मी..

Manoj Jarange Patil : मराठा समाज आरक्षणासाठी आक्रमक झाला आहे. आरक्षणाच्या मागणीसाठी आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी आमरण उपोषण केले होते. तसेच आज राजगुरूनगर येथे मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वात सभा झाली. Manoj Jarange Patil

जरांगे पाटील शुक्रवारी (ता. २० ) राजगुरूनगर येथे आले असता सभा संपल्यानंतर एका तरुणाने स्टेजवर येत माईक हातात घेऊन गोंधळ घालण्याचा प्रयत्न केला. जालना येथील सुनील कावळे या तरुणाने मुंबई येथे गुरुवारी (ता. १९) आत्महत्या केली. या तरुणाला तसेच मराठा आंदोलनादरम्यान ४७ पेक्षा जास्त मराठा बांधवांनी आत्महत्या केल्या. त्यांचे बलिदान वाया जाऊ दिले जाणार नाही. Manoj Jarange Patil
मराठा समाजाला शांततेत आंदोलन करून आरक्षण मिळवून देण्याचा शब्द देत मनोज जरांगे पाटील यांनी या सर्वांना श्रद्धांजली अर्पण करण्याचे आवाहन केले. त्यानुसार सभा संपल्यानंतर सर्वजण श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी उभे राहिले असताना एक तरुण अचानक स्टेजवर आला. Manoj Jarange Patil

जरांगे पाटील यांच्या हातातील माईक आपल्या हातात घेऊन त्याने आपल्याला बोलायचे आहे असा आग्रह केला. मात्र सभा संपल्याने आयोजकांनी त्याला बोलू दिले नाही. त्यावरून त्याने गोंधळ करण्याचा प्रयत्न केला.

दरम्यान, पोलिसांनी संबंधित तरुणाची समजूत काढून त्याला स्टेजवरून खाली नेले. जरांगे पाटील म्हणाले, त्या तरुणाची समजूत काढली आहे. त्यांना बोलायचे होते, पण नियोजित कार्यक्रमात बोलता आले नाही. त्यांचे मनपरिवर्तन झाले आहे. मराठा आंदोलनाला गालबोट लागावे हेच सरकारला हवे आहे. पण कोणीही गोंधळ करू नये. असे ते म्हणाले आहे.